The Philanthropist The Consultant The Socialist

Sunday 21 October 2018


शहीदांचे घर : राजगुरुवाडा, राजगुरूनगर-खेड

@ राजगुरू वाडा राजगुरूनगर (खेड) जि. पुणे  

न इज्जत दे,
न अजमत दे,
न सूरत दे,
न सीरत दे,
मेरे वतन के वास्ते, ए रब !
मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे !
                            
                असे म्हणत हसत-हसत स्वातंत्र्यासाठी फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांच्या, शहिदांच्या घरी जावे त्यांच्या नातलगांना भेटावे. त्यांचा माहिती नसलेला, वास्तविक माहिती होऊ न दिलेला छुपा इतिहास जाणून घ्यावा. ज्या पवित्र स्थानी त्यांचा जन्म झाला, ज्या स्थानी क्रांतीची सुरवात झाली अश्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावे. त्याठिकाणी माथा टेकावा. अशी ओढ खूप दिवसापासून होती. पुण्याशेजारी राजगुरूनगर (खेड) आहे; जिथे शाहिद शिवराम राजगुरूंचे घर आहे. आम्ही राजगुरूनगर येथे राजगुरुवाड्यावर गेलो. शिवराम राजगुरू हे मूळचे ब्राह्माण कुटुंबातील होते. त्यांचे आडनाव ब्रह्मे होते, परंतु राजाश्रयामुळे त्यांना खेड येथे जागा मिळाली आणि राजाचे गुरू या अर्थी सर्वजण राजगुरू बोलू लागले. त्यावरून राजगुरू हे आडनाव पडले. अशी माहिती स्थानिक राजगुरूनगर नगरपालिका कर्मचारी सौ. शोभा यांनी दिली. राजगुरू वाडा हा २.५ एकरात विस्तारित होता. परंतु नंतर काही जागा विकल्याने सध्या तो एकरभर जागेत असावा. भीमा नदीच्या अगदी काठावरच हा राजगुरू वाडा आहे. पुणे-मंचर हायवे पुलापासून साधारणतः अर्ध्या किलोमीटर अंतरावर असेल. स्थानिक नगरपालिका राजगुरू वाड्याची चांगली देखभाल करीत आहे. परंतु अजून देखील संवर्धनाची गरज आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या या शहिदांना तुलनेने कमीच किंमत मिळाली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हे या ठिकाणी आल्यावर दिसणाऱ्या भग्न अवस्थेतील वास्तूंवरून स्पष्ट दिसून येतेचं.

                         
शहीद राजगुरू यांचे जन्म घर (राजगुरुनगर (खेद) जि. पुणे)
राजगुरू वाड्याची बांधणी जुन्या दगडी विटात केली आहे. त्याच्या भिंती ३ फुटी आहेत. भव्यदिव्य अश्या वाड्यात गेल्यावर क्रांतीची मशाल येथूनच पेटल्याचे स्पष्ट भासते. छाती अभिमानाने भरून येते. राजगुरू हे ब्राह्मण कुटुंबातून होते. त्यांचे वडील इंग्रज प्रशासनात नोकरीला होते. परंतु राजगुरू मात्र याउलट स्वातंत्र्य, क्रांतीच्या बाजूने, विद्रोही विचारसरणीचे होते. राजगुरू यांचे वय जेमतेम १४ वर्षे होते. त्यावेळी पुणे-मंचर रस्त्यावरून इंग्रज ताफा निघाला होता.
या भीमा नदीवरील पुणे-मंचर पुलावरून इंग्रज ये जा करत होते. 
त्यावेळी राजगुरू यांनी इंग्रज अधिकाऱ्याला दगड मारला 
एक रस्तेकरू शेतकरी त्यांच्या गाडीच्या आडवा आला यावर इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला बेदम मारले. हे सर्व पाहून राजगुरू उद्विग्न झाले आणि त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याला दगड मारला आणि ते कोणालाही न समजता गर्दीतून निघून गेले. राजगुरू हे अचूक नेमबाज होते. या प्रसंगानंतर राजगुरू यांच्या मनात इंग्रज सत्तेविरोधात बंड निर्माण होऊन हा क्रांतिकारक जन्माला आला. ब्राह्मण समाजात जन्म खोली वेगळी आणि आतल्या भागात असते. राजगुरु वाड्यात आपल्याला त्यांचे जन्मस्थळ खोली ही वाड्याच्या आत भीमा नदीच्या तीरावर पाहायला मिळेल. यातून आपल्याला त्याकाळी गर्भवती स्त्रीची किती काळजी घेतली जायची हे समजेल.
शहीद राजगुरू यांच्या
जन्म खोलीतील धान्याचे पेव 
या खोलीत अंदाजे २० फूट खोल असणारे धान्य पेव आहे. पूर्वीच्या काळी चोर आणि इंग्रज अधिकारी यांच्या लुटमारीतून वाचण्यासाठी धान्याचे कोठार हे जमिनीखाली खोदले जायचे आणि या ठिकाणी धान्य लपवून ठेवले जात होते. 

                  
शहीद राजगुरू यांची व्यायामशाळा जिची अवस्था बिकट असून
या वस्तूचे संवर्धन करणे गरजेचे आहे
.
त्याचबरोबर या ठिकाणी शहिद राजगुरू यांची व्यायामशाळा आहे. परंतु तिची अवस्था बिकट असून या इमारतीची डागडुजी करणे गरजेचे आहे. या व्यायामशाळेतूनच गुप्त पद्धतीने नदीमध्ये जाण्याचा मार्ग आहे. आम्हाला सौ. शोभा माहिती सांगत असताना त्यांनी सांगितले की, याठिकाणी शहिद दिन आणि राजगुरू यांची जयंती साजरी केली जाते. ज्यादिवशी राजगुरू यांना फाशी झाली म्हणजे २३ मार्चला २२ मार्चच्या मध्यरात्री संपूर्ण राजगुरूनगर हे जागे असते आणि गावातील संपूर्ण लाईट घालवली जाते. सर्व ठिकाणी मशाली पेटवल्या जातात. हे ऐकत असताना आम्ही या प्रसंगाची आणि राजगुरू यांना झालेल्या फाशीची कल्पना करत होतो. माझ्या अंगावर शहारे येत होते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना लाहोर येथे फाशी दिल्यावर त्यांची प्रेतं इंग्रजांनी दहन केल्याच्या ठिकाणची माती कलश या ठिकाणी आहे. त्याचे दर्शन घेऊन आम्ही या वीरांना श्रद्धांजली वाहिली. राजगुरू वाड्यात अनेक क्रांतिकारकांचे खरे फोटो आहेत.
शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या
समाधी स्थळावरील पवित्र माती 
                 याठिकाणी अजून एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे ते म्हणजे सती जाणाऱ्या महिलांची समाधी. भीमा नदीच्या काठावर राजगुरू वाड्यालगत हिंदू धर्मातील सर्वात अनिष्ठ प्रथा-सतीप्रथा. पती स्वर्गवासी झाल्यावर त्याच्या अग्निकुंडात उडी मारून स्वतःला दहन करून घेणे म्हणजे सती जाणे. अश्या अनेक महिला या ठिकाणी सती गेल्या आहेत. त्यांची नावे या कुंडावर आहेत. हे समाधी स्थळ हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे. 
हाच तो सतीकुंड ज्यावर अनेक स्त्रियांनी
पतीच्या अग्नीत स्वतःला दहन करून घेतले आहे.
या विरस्थळी एक उणीव जाणवली ती म्हणजे शहीद राजगुरू यांच्या वस्तू. शासनाने लक्ष घालून याठिकाणी त्यांच्या वस्तू आणून जतन करून ठेवायला पाहिजेत. पण एकूण सर्व परिस्थितीकडे पाहून असे लक्षात येते की, शासन याबाबतीत फार उदासीन आहे. स्थानिक नगरपालिकेने सुयोग्य संवर्धन आणि व्यवस्थापन केले आहे. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारला शिवराम राजगुरूंचा विसर पडलाय असे वाटते. २०१४ च्या निवडणुकांवेळी याठिकाणी अमित शाह आले होते. त्याचबरोबर निवडणुका लागल्या की आमदार, खासदार, मंत्री येत असतात मोठमोठी आश्वासने देत असतात. पण कोणीही या वीरांच्या घराचे, पवित्र स्थळाचे संवर्धन व्हावे यासाठी निधी देत नाही अथवा प्रयत्नही करत नाही. एकूणच काय यामागचे राजकारण एवढेच की, या वीरांनी कधीही स्वातंत्र्याचं श्रेय घेतलं नाही किंवा मागण्या अगोदरच ते विरगतीला प्राप्त झाले. म्हणून आत्ताची व्यवस्था त्यांना जास्त मान-सन्मान मिळू नये यासाठी त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचू देत नाही. पण यांना माहिती नाही की, अजूनही भारतातील सर्वसामान्य लोकांच्या मनातले हिरो शाहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूच आहेत आणि कायमस्वरूपी राहतील. राजगुरुवाडा हे काही टुरिस्ट प्लेस नाही तर हे प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे प्रार्थना स्थळ, देवाचे ठिकाण आहे असे मला वाटते. आम्हाला मात्र याठिकाणी येऊन प्रचंड अभिमान, गर्व आणि आत्मविश्वास निर्माण झाला. हे स्वाभाविक होत कारण आम्ही शहिदांच्या घरी होतो.
                शिवराम राजगुरू यांचे वडील इंग्रज प्रशासनात नोकरीला होते. त्यांचा मृत्यू प्लेगच्या साथीने झाला त्यानंतर राजगुरू यांचे भाऊ इंग्रजांच्यात नोकरीला होते. प्रचंड पैसा, संपत्ती आणि प्रतिष्ठा असतानासुद्धा फक्त मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी शहिद राजगुरू यांनी निस्वार्थी बलिदान दिले. आणि देशातील सध्याची यंत्रणा आणि काही विद्यालये यांच्या पुस्तकातून या शहिदांना आतंकवादी असे संबोधन दिले आहे. या हरामखोर औलादिंना या शहिदांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही. पण वाईट वाटते ते या व्यवस्थेचं. लोकशाही-लोकशाही म्हणत सत्ता हस्तगत केली. आणि या वीरांना इतिहासात मुजवण्याचा प्रयत्न केला. पण या शहीदांचं बलिदान, कार्य कधीही भारतीयांच्या मनातून जाणार नाही याची मला खात्री आहे. 
             या लेखाच्या निमित्ताने माझे आपणास आव्हान आहे कि, आपणसुद्धा आपला किंमती वेळ हा इतर ठिकाणी मौज-मजा करण्यात न घालवता या शहीद परिवारांच्या घरी जाऊन अभिमान, गर्व आणि प्रचंड आत्मविश्वासाची अनुभूती घ्यावी. आपल्या मुला-बाळांना शहिदांच्या इतिहासाची आठवण करून द्यावी जेणेकरून या ताण-तणावाच्या जीवनात ते कधीही हताश आणि अपयशी होऊन वाईट पाउल उचलणार नाहीत. आपण या शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्म स्थळाला भेट द्याल हीच अपेक्षा.

                                                               आपलाच,
                                                     प्रमोद महादेव मांडवे
                                          संस्थापक/ अध्यक्ष शिवशक्ती समूह 

राजगुरू वाड्यातील थोरला वाडा यामधील बैठक खोली 
राजगुरू वाडा 
राजगुरू वाड्यातील थोरला वाडा 
राजगुरू वाडा पाठीमागील बाजूने 

Friday 19 October 2018




शिवशक्ती दिनदर्शिका : दिनदर्शिका नाही भविष्य आपल्या हातात


                             २०११/१२ साल हे माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होते. आपण ज्यावेळी आपल्या ऐन तारुण्यात असतो. त्यावेळी आपण वारंवार भटकत असतो. वेगवेगळ्या सुंदर गोष्टींकडे आकर्षित होत असतो. वास्तविक ती सुंदर गोष्ट नसून आयुष्य बरबाद करनारा बॉम्ब असतो. पण हे वयच अस असत जिथे काहीच सुचत नाही. मी पण या वयात भरपूर भटकलो. बेचैन पक्षी जसा या डहाळी वरून त्या डहाळी वर सारखा उठ बस करत असतो. तसा मी या क्षेत्रातून त्या क्षेत्रात जात होतो. अश्यावेळी आपल्याला चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. मी आणि माझा मोठा भाऊ विकास मांडवे नानीज येथे स्वामी नरेंद्रनाथ महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. मला पहिल्यांदा असल्या गोष्टीवर विश्वास न्हवता. आणि वास्तविक भगवी कपडे घालणारा भोंदू, बुवा असे सर्वसामान्य मत असते. परंतु वास्तविकता फार वेगळी आहे.
शिवशक्ती दिनदर्शिका २०१६ 
                माझे चुलते कै. अधिकभाऊ यांची स्वामींच्यावर खूप श्रद्धा होती. त्यांच्या आग्रहास्तव आणि मजा करण्यासाठी आम्ही नानीज येथे गेलो. तिथे महाराजांना आपल्या शंका विचारायची पद्धत होती. खूप लोक रांग लावून वेगवेगळ्या शंकांचे समाधान महाराजांकडून ऐकण्यास बसले होते. कोणाचे कौटुंबिक प्रश्न तर कुणाचे आर्थिक असे अनेक प्रश्न होते. माझा नंबर आला मी महाराजांना चिठ्ठीतून लिहलेला प्रश्न विचारला. महाराज, मला खूप मोठे व्हायचे आहे. पण काय करावे, कस करावं हे मला समजत नाही. यावर महाराजांनी मला जे उत्तर दिले त्यामुळे माझ्यात वैचारिक बदल झाले. महाराज म्हणाले, बाळा तु मोठी माणसे बघितली अशचिल. पण त्यांचे कार्य, दिवसाचे वेळेचे नियोजन बघितले आहेस काय? मी म्हणालो नाही. त्यांनी सांगितले अश्या मोठ्या व्यक्तींची ध्येय, उद्दीष्ठे आणि वेळेचं नियोजन हे आधीच ठरलेले असतं. आणि हे ठरवण्यासाठी, नियोजनासाठी त्यांच्याकडे नियोजन करणारी माणसे व्यक्ती, पी.ए असतात. ते त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं नियोजन करतात. ते दिवसात कुठे जाणार, किती वेळ थांबणार अगदी काटेकोर नियोजन करतात आणी ते पाळतात. आपण आपल्या आयुष्याचे कोणत्याच गोष्टीच नियोजन करत नाही. तू तुझ्या आयुष्याचं नियोजन कर तुला जे व्हाचंय तू शंभर टक्के होशील. हे शब्द आजही माझ्या लक्षात आहेत.
शिवशक्ती दिनदर्शिका २०१७ 
                        मी सारखा या गोष्टींचा, कायमचे नियोजन करण्याचा विचार करत होतो. त्यावेळी मला माझ्या शालेय जीवनाची आठवण झाली. शालेय जीवनात अभ्यासाचे, खेळाचे नियोजन करण्यासाठी मी दिनदर्शिकेचे वापर करायचो. तसेच घरातील मोठी मंडळी सुद्धा महत्वाची कामे, भविष्यकालीन योजना आणि संकल्पना आदी दिनदर्शिकेत नोंदी ठेवत होते. त्याचबरोबर नाणीज मठाची दिनदर्शिका आणि कार्यक्रम यांचे नियोजनही वर्षभर आधीच केलेले असते. मी ही युक्ती पुन्हा वापरायचे ठरवले. मी माझी महत्वाची कामे आणि संकल्पना यांचे नियोजन करून दिनदर्शिकेत लिहून ठेऊ लागलो. आणि एक वर्षात माझ्या लक्षात आले की, मी त्या वर्षात ठेवलेली ध्येय आणि त्याचे नियोजन हे जवळजवळ १०० टक्के यशस्वी झाले होते. मग एक दिवस अमोल वंडे जे माझे जवळचे मित्र आहेत ते ना नफा ना तोटा तत्वावर कृष्णाकाठ दिनदर्शिका छापत होते. आणि मग आम्हीपण शिवशक्ती दिनदर्शिका ना नफा ना तोटा तत्वावर, जाहिरात संकलानातून छापण्याचा निर्णय घेतला. आमचा उद्देश स्पष्ट आणि निस्वार्थी होता. शिवशक्ती दिनदर्शिकेच्या माध्यमातून लोकांना त्यांचा आयुष्याचे, भविष्याचे नियोजन करण्याची सवय लावणे हा मुख्य उद्देश. म्हणूनच शिवशक्ती दिनदर्शिकेचे ब्रीद वाक्य आहे, ' दिनदर्शिका नाही भविष्य आपल्या हातात '. त्याचबरोबर स्थानिक व्यवसाय व उद्योजक
शिवशक्ती दिनदर्शिका २०१८ 

यांना जाहिरातीसाठी प्रभावी व दीर्घ कालावधीचे माध्यम उपलब्ध करून त्याला सामाजिक उपक्रमाची जोड देणे या उद्देशात आम्ही शिवशक्ती दिनदर्शिकेच्या माध्यमातून सफल झालो आहोत. शिवशक्ती दिनदर्शिका ही ११,००० घरात मोफत जात असल्याने तसेच वर्षभर घरी राहत असल्याने शिवशक्ती दिनदर्शिकेच्या माध्यमातून जवळपास १ लक्ष लोकांपर्यंत आपली जाहिरात पोहचून आपले आपल्या व्यवसायाचे विपणन होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर या ११,००० लोकांना शिवशक्ती दिनदर्शिका मोफत मिळत असल्याने नवी दिनदर्शिका घ्यावी लागत नाही त्यामुळे या सर्व कुटुंबाचा एकूण ३ लक्ष रुपयांचा फायदा होत आहे. हा पण, या मोफत संकल्पनेमुळे ज्यांचा दिनदर्शिका छपाई व विक्रीचा व्यवसाय आहे त्यांनी आम्हाला त्रास दिला. पण हा व्यवसाय नसून सर्व सामाजिक कार्य असल्याने आमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकली नाही. यंदाचे आमचे हे सहावे वर्ष असून सन २०१५ साली प्रथम १,००० दिनदर्शिका आम्ही मोफत वितरित केल्या होत्या. तदनंतर आज रोजी ११,००० पर्यंतचा विक्रमी टप्पा आम्ही गाठला आहे. यासाठी आमच्यावर विश्वास ठेवून व सामाजिक जबाबदारी ओळखून जाहिरात देणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आणि शिवशक्ती दिनदर्शिकेसाठी सर्वोत्तपरी आर्थिक, मानसिक आणि भौतिक सहकार्य करणाऱ्या लोकांचे योगदान अनमोल आहे.

         पण आता जबाबदारी वाढत आहे. आपण चालू केलेला सामाजिक यज्ञ थांबून न देण्याची
शिवशक्ती दिनदर्शिका २०१९ 
जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शिवशक्ती सोशल फाउंडेशन संचलित ' शिवशक्ती दिनदर्शिका ' ११,००० प्रतींचे मोफत वितरण हे ७ वे वर्ष आहे. ही सात वर्षे संस्थेच्या सामाजिक उपक्रमास सहकार्य करणाऱ्या विविध संस्था, व्यक्ती, मान्यवर, व सर्व नागरिकांच्या त्यागाची व समाधानाची सहा वर्षे आहेत असे आमचे म्हणणे आहे. सदर शिवशक्ती दिनदर्शिका या उपक्रमाकडे फक्त जाहिरात म्हणून न पाहता एक भविष्यकालीन गुंतवणूक व सामाजिक जबाबदारी या दृष्टिकोनातून पहावे व आपल्या संस्थेची, व्यवसायाची, वाढदिवस, शुभेच्छा यांची जाहिरात देऊन सामाजिक कार्यास हातभार लावावा ही नम्र विनंती.

                                                                                                                                                                                         

                                                                      आपलाच,
                                                           प्रमोद महादेव मांडवे
                                         संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती सोशल फौंडेशन



शिवशक्ती दिनदर्शिका २०२० 




: जाहीरातीसाठी संपर्क : 

८९७५३०७४७०,९६७३३७१७८५ , ९६९००९८२६५ 




११,००० शिवशक्ती दिनदर्शिका मोफत वितरण करण्यात आलेल्या शाळ



ü मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या शाळा कडेगांव
ü महात्मा गांधी विद्यालय, कडेगांव
ü न्यू सेकंडरी स्कूल, नेर्ली
ü श्री शिवछत्रपती विद्यालय, शिवाजीनगर
ü मुकुंदराज विद्यालय, शाळगांव
ü जिल्हा परिषद शाळा, शाळगांव
ü जिल्हा परिषद शाळा, अपशिंगे
ü शासकीय आय.टी.आय. कडेगांव
ü जिल्हा परिषद शाळा, बेलवडे
ü जिल्हा परिषद शाळा, बोंबाळेवाडी
ü जिल्हा परिषद शाळा, हिंगणगांव खुर्द
ü जिल्हा परिषद शाळा नं १ खंबाळे औंध
ü जिल्हा परिषद शाळा नं. २ खंबाळे औंध
ü जिल्हा परिषद शाळा, कोतवडे
ü जिल्हा परिषद शाळा, निमसोड
ü जिल्हा परिषद शाळा, तडसर
ü तात्या रावजी विद्यालय, तडसर
ü जिल्हा परिषद शाळा, रायगाव
ü जिल्हा परिषद शाळा, विहापूर
ü जिल्हा परिषद शाळा, रेनुशेवाडी
ü अभिजित दादा कदम विद्यालय, अमरापूर
ü जिल्हा परिषद शाळा, येडे-उपाळे
ü भारती विद्यापीठ, सोहोली
ü जिल्हा परिषद शाळा, हणमंत वडीये  



शिवशक्ती दिनदर्शिका २०२० चे प्रकाशन बहुजन नेते एम.एम.नाना मदने, सांगली जि.प. चे सभापती ब्रह्मानंद पडळकर व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. 



शिवशक्ती दिनदर्शिका २०१९ चे प्रकाशन मा. गोपीचंद पडळकर साहेब व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.





११००० शिवशक्ती दिनदर्शिका मोफत वितरण 



Wednesday 10 October 2018

शिवशक्तीचा अनमोल रत्न : अमोलदादा

         
               तुमचं हसणं हे तुमच्या विरोधकांचा रडगाणं असत असे म्हणतात. अडचणीतसुद्धा हसणं आणि हसवत राहणाऱ्या व्यक्तिमत्वाला सर्वसमावेशक, अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणावे. अमोल दादा असाच सर्वांचा लाडका अजातशत्रू स्वभावाचा व्यक्ती. त्याचा स्मितभाषी चेहरा सर्वकाही सांगून जातो. माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. पण तो आणि मी माझ्या लहानपणी पासूनच खास मित्रांप्रमाणे एकत्र जिवाभावाचे आहे. त्यामुळे माझे गुपित त्याला आणि त्याचे मला माहिती आहे. त्यामुळे एकमेकांची उणि-धुनी काढण्यापेक्षा तह करून आम्ही दोघे मार्गक्रमण करत असतो. सुख असो दुःख असो माझी सावली बनून भक्कमपणे जसा हिमालय उभा आहे तसा अमोलदादा माझ्या पाठीमागे उभा आहे. त्याच्या सहवासात मला कशाचीच भीती वाटत नाही.              
          २०११/१२ साली आमचा एम.आय.डी. सी. आणि महसूल प्रशासन यांच्याविरोधात संघर्ष चालू होता. मी पहिल्यांदाच चळवळीत शिरलो होतो. मला जमीन, कायदे आणि प्रशासन प्रक्रिया यांचे शून्य ज्ञान होते. अश्यावेळी प्रशासनाच्या विरोधात लढताना माझी पळती भुई थोडी झाली होती. आणि माझ्याबरोबर माणसेही कमी होती. कमी नाही तर कोणीच न्हवतं. आम्ही उद्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार होतो. त्यासाठी प्रशासनाच्या परवानग्या, मंडप व्यवस्था आणि सर्व कार्ये आम्हाला करायची होती. मला खूप टेन्शन येत होते. अमोलदादा मात्र निवांत होता. सर्व कामे पाहत होता. रात्री दोन वाजले तरी आम्ही कडेगाव मध्ये मंडप घालत होतो. पोलीस हे प्रशासनाच्या बाजूने होते. त्यामुळे आम्हाला धमकावने आणि भीती घालणे हि कुटकामे सुपारी घेऊन पोलीस करत होते. मला भीतीही वाटायची पण अश्यावेळी अमोल दादा या सर्व अडचणींना सामोरे जायचा. त्यांच्याशी, त्यांची स्मितभाषी, गोडबोल्या स्वभावातून समजूत घालत होता. आणि शेवटी नाहीच ऐकले तर अस्सल क्षत्रिय भाषेत सुनावत होता. मग पोलिसांशी वादही झाला.
           खरंतर आम्ही सर्व एकसारखेच होतो. जास्त काही फरक नाही. आमचे खानदान सर्वसामान्य आणि प्रशासनाच्या अन्यायात दबून बसलेलं होत. त्यामुळे भांडण-तंटा-वाद याची जास्त सवय आमच्या युवा पीढिला न्हवती. त्यातच पूर्वीच्या भांडण-तंट्यात घरदार होरपळले होतं. त्यामुळे आमच्या घरातील मोठे लोक असे आंदोलन आणि प्रशासन यांना भीत होते. त्यारात्री आमचा पोलिसांशी वाद झाल्यानंतर अमोल दादा ने पोलिसांना चांगलेच सुनावले. मी खूप भ्यायलो होतो. मी अमोल दादा ला विचारले तुला पोलिसांची भीती वाटत नाही काय? अमोल दादा मला म्हणाला तू असल्यावर मला कुणाचीच भीती वाटत नाही. तू असल्यावर पोलिसच काय मंत्र्यांच्या कॉलरला मी हात लावीन. असे आम्ही दोघेजण एकसारखेच पण एकमेकांची शक्ती होतो. त्याला कोण काही बोललं तर जरी मी शरीराने मध्यम असलो तरी माझ्या अंगात सोळा सहस्त्र हत्तीचं बळ आल्यासारखं वाटत. आणि मी भिडतो. असे आम्ही सर्व शिवशक्तीच्या शिलेदारांनी आपल्या हक्कासाठी, सर्वसामान्यांच्या विकासासाठी " शिवशक्ती " ची स्थापन केली. यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा अमोलदादाचा आहे. आपल्यात जे कलागुण आहेत. त्याचा उपयोग सामजिक कार्यासाठी करण्याची कला अमोल दादाला जन्मजातच आहे असे मला वाटते. प्रत्येक कार्यात सर्वाना सामावून घेण्याची वृत्ती त्याच्यात जन्मजातच होती. त्यामुळे लहान असो वा थोर सगळ्यांशी त्याचे चांगले संबंध आहेत. प्रत्येकाला त्याच्या स्वभावानुसार योग्य वैचारिक औषध देण्यामध्ये त्याचा हातकंडा आहे.
          शेती, स्वतःचा टूर्सचा व्यवसाय आणि कुटुंब अशी मल्टिटास्किंग कामे अमोलदादा कडून शिकावीत. व्यवसायात तर पक्का गुजराती-मारवाडी असल्यासारखा आहे. त्याच्या या गुणांचा उपयोग आम्ही कोणताही व्यवहार करणे अथवा खरेदी करताना करतो. कारण तो आमच्यापेक्षा जास्त नफा मिळवूनच देतो. हा त्याचा चेंगूस नाही तर सजग स्वभाव गुण जो आमच्यात नाही तो त्याच्यात आहे. आमच्या सर्व शिवशक्तीच्या शिलेदारांच्या मनगटाची ताकद अमोलदादा आहे. आमची सर्वांची हीच एकी लोकांच्या नजरेत येते आणि मग आम्हाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न चालू होतो. पण अशा वेळी अमोल दादाच असतो जो सर्वांना जोडून ठेवतो. आपल्याकडे पुन्हा ओढून घेतो. त्यामुळे त्याला शिवशक्तीचा चुंबक म्हंटले तरी चालेल.
         शिवशक्ती फौंडेशनच्या सामाजिक उपक्रमांबरोबर येणाऱ्या काळात ' शिवशक्ती संचलित कडेगांव तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. ' च्या व्यवस्थापनाची जबादारीपण अमोल दादाच्या खांद्यावर आहे. तो ही जबादारी त्याच्या व्यवसाय कौशल्याच्या जोरावर निश्चितपणे निभावेल असा आमचा विश्वास आहे.अश्या या निर्भीड, कर्तृत्ववान, दृष्ट्या व मनमिळाऊ भावाला महादेवाच्या त्रिनेत्रातील शक्ती, छत्रपती शिवरायांच्या तलवारीची ताकद, स्वामीजींचे आचार-विचार, भगतसिंग-सुखदेव-राजगुरू-चंद्रशेखर आझाद यांचा दृढ आत्मविश्वास, लोकमान्य टिळकांसारखा संयम, सावरकरांतील त्याग, नेताजी सुभाषबाबूंप्रमाणे राष्ट्रभक्ती, डॉ. आंबेडकरांतील तत्परता अमोल दादांना सतत लाभो हीच या वाढदिनी ईश्वरचरणी प्रार्थना आणि वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा.

                                                                           आपलाच,
                                                                 प्रमोद महादेव मांडवे
                                                        संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती समूह
सांगली जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांना दिनदर्शिका भेट देताना अमोल मांडवे 

कडेगांव पंचायत समिती सभापती सौ. मंदाताई करांडे यांचे स्वागत करताना शिवशक्तीचे उपाध्यक्ष अमोल मांडवे 

शिवशक्तीच्या मोफत वारी सहल उपक्रमांतर्गत वारकरी व भजनी यांच्यासमवेत पंढरपूर येथे मा. अमोल मांडवे 

शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य श्री. विशालजी गायकवाड यांचा सत्कार करताना अमोल मांडवे 

उद्योजक मुरलीधर आप्पा महाडिक यांचा सन्मान करताना अमोल मांडवे 


क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पंतु श्री. सचिन मोरे यांचे पुस्तक देऊन स्वागत करताना अमोल मांडवे 

Wednesday 3 October 2018


         बदनामीचे षडयंत्र : सत्यंम्, शिवम्, सुंदरम्                                                          

        नमस्कार दि.२४ रोजी माझ्या समर्थनार्थ व सत्य रक्षणासाठी आपण सर्व सहकारी मित्र, मार्गदर्शक व प्रियजनांनी राजकीय, सामाजिक विरोधाला न जुमानता मा. तहसीलदार व पी.आय यांना निवेदन देऊन सत्य तपासणीची मागणी केली व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आणि असे न झाल्यास अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला. यातून सामाजिक माणुसकीचे दर्शन होऊन ' सत्यमेव जयते ' सत्यंम् शिवंम्, सुंदरम् या  तत्वासाठी आपण सर्वांनी प्राणांची बाजी लावण्याची तयारी दर्शवली याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे.
         संघर्ष करायला घाबरणे, ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत. आपण सर्व निर्भीड आहात याची प्रचिती सर्वाना आली आहे. मला नेहमी ऐकवायस मिळते की, माणसे चांगली नाहीत, कलीयुग आहे. कलियुगात सत्याचा विजय होत नसतो. माझे मनही कधीकधी हे मानण्यास तयार होते. परंतु अश्यावेळी आपल्यासारखी माणसे देवदूतप्रमाणे येऊन माझे मनोबल वाढवत आहेत. जसजसे दिवस वाढत आहे तसतसे गाव, तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि काही जिल्ह्याबाहेरील लोकांनी मला उघड पाठिंबा सोशल मीडिया व टेलिफोन आदींच्या माध्यमातून जाहीर केला आहे. आणि फक्त पाठिंबाच नाही तर सत्यरक्षणसाठी पर्यायी घरदार सोडून रस्त्यावर येण्याची तयारी दर्शवली आहे. हे सहकार्य हे माझ्यासाठी फक्त बुडत्याला सहारा देणाऱ्या काडी एवढेच नसून अनमोल असे आभाळभर आहे. 
        नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प मी आपल्या सहकार्याने आयुष्यभर पाळणार असून शिवशक्ती सोशल फाउंडेशन व शिवशक्तीच्या इतर संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य, गोर-गरीब यांच्या हक्कासाठी संघर्ष करन्याचा निग्रह मी केला आहे. आपल्या सर्वांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासासाठी आणि मूलभूत हक्क यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने स्वच्छ नीतीमत्तेने सामाजिक लढा उभा करीत आहे. सत्यरक्षण आणि लोकशाही बळकटीकरण यासाठी आपण सर्व सत्यरक्षक चांगल्या विचाराच्या माणसांनी पुढील लढाईसाठी तयार राहावे व सत्यधर्मासाठी आपले योगदान द्यावे. 
      पुढील लढाईच्या सूचना योग्य वेळीस मिळतीलच. पण सत्याचा मार्ग हा कठीण असतो असे म्हणतात, त्यामुळे या मार्गावर चालताना खूप काटे असतात परंतु अंतिम विजय हा सत्याचाच होतो. त्यासाठी आपली एकी ही पुन्हा सत्यधर्म स्थापन करील अशी आशा करतो. पुनःश्च सर्वांचे आभार.
                                                                                             आपलाच,
                                                                                  प्रमोद महादेव मांडवे 
                                                                  संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती सोशल फाउंडेशन

#IsupportGm

तहसीलदार कडेगांव श्रीमती अर्चना शेटे यांना प्रमोद मांडवे यांच्यावरील गुन्हा मागे घेनेसाठी निवेदन देताना शिवशक्तीचे कार्यकर्ते.

पोलीस स्टेशन कडेगांव पोलीस अमलदार यांना निवेदन देताना शिवशक्तीचे कार्यकर्ते. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा 


मा. प्रमोद मांडवे उर्फ भाऊसाहेब
संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती समूह 

बदनामीचे षडयंत्र : तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करणे की, जब-जब भी मैं बिखरा हूँ , दुगनी रफ़्तार से निखरा हूँ।


       एकजण काल परवा मला भेटला आणि आनंदात हसत-हसत म्हणाला, काय कोणत्या बाईचा हात धरला. मला खूप राग आला होता. पण संयम पाळणे गरजेचे आहे असे स्वतःच्याच मनाला भासवून मी शांत झालो. ज्यावेळी तुम्ही चूक केलेली नसते आणि तुम्ही चूक केली आहे असा खोटा प्रचार होऊ लागतो, त्यावेळी आपले मानसिक संतुलन ढळते आणि आपण भांडू लागतो. पण मी असे काही केले नाही. किंवा त्याला स्पष्टीकरणसुद्धा देत बसलो नाही. जो माणूस माझ्यावर होणाऱ्या खोट्या आरोपांनी खूष होऊन विकृत आनंद घेत असेल तर त्याला स्पष्टीकरण देऊन आपली ताकद का व्यर्थ घालवायची. आणि तसाही तो असत्याचा पुजारी सत्याचा प्रचार कुठे करणार आहे.
      थोड्यावेळाने तो माणूस पुन्हा खोटी सहानुभूती दाखवत बोलला. विनयभंग- विनयभंग अशी बोंब सगळीकडे उठली आहे. खोटी सहानुभूती दाखवत पुन्हा म्हणाला, तू असे करू शकत नाहीस पण लोक बोलतायत. मी हसलो आणि मला गोबेल्स नीती आठवली. एखादं असत्य पुन्हा पुन्हा सातत्याने सांगत राहीले की हळूहळू लोकांचा त्यावर विश्वास बसू लागतो. जे प्रत्यक्षात नाही ते आहे, असे सतत भासवून, लोकांच्या मनावर ठसवून जनमतावर प्रभाव टाकण्याचे तंत्र म्हणजे गोबेल्स नीती. सध्या ही नीती राबवून मला म्हणजेच प्रमोद मांडवे यांना बदनाम करणे हे सामाजिक कार्य काही लोकांनी हाती घेतले आहे याचा मला राग नाही तर आनंदच आहे. निदान रिकामटेकडे काहीतरी काम करतायत. पण हे काम सत्याच्या बाजूने केले असते तर आदर्शवत म्हणता आले असते.
     मी त्या माणसापुढे आनंदी चेहऱ्याने हसतच होतो. माझ्या निर्भीडपणामुळे तो थोडा बेचैन, नाराज झाला. मी असा खोटा आरोप होऊन सुद्धा शांत आहे, निवांत आहे, हसत-खेळत पुन्हा सामाजिक कामे हातात घेऊन कार्य करीत आहे, अश्या खोट्या आरोपांनी मला काहीही फरक पडत नाही हे त्या माणसाच्या लक्षात आल्यावर त्याने चेहरा पाडला. एवढ्या अडचणीत सुद्धा तुमचं हसन हेच जगाच रडणं असतं. हे यावेळी माझ्या लक्षात आले. तुम्हाला जर कोणाला हरवायचे असेल तर तुमचा आनंद आणि तुमचे स्मित हास्य सर्वाना पराजित करू शकते. याचा प्रत्यक्ष धडा मला मिळाला.
       दिवसेंदिवस विरोधक आणि असत्याचे पुजारी वाढत असताना मी संघर्ष सोडला नाही. गोबेल्स नीती वापरून लोकांच्या मनात मी आणि माझ्या चरित्र्याविषयी शंका निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. पण माझी मानसिक ताकद वाढतच आहे. जे सत्य असतात त्यांचे मनोबल नेहमी उच्च असते. म्हणून माझ्या हितचिंतकांसाठी एक ओळ लिहावी वाटली.
तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करणे की, जब-जब भी मैं बिखरा हूँ , दुगनी रफ़्तार से निखरा हूँ।

                                                                              आपलाच
                                                                       प्रमोद महादेव मांडवे
                                                              संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती समुह

#IsupportGm

मी कोण आहे...

        मला ना कोणाचा राग आहे ना लोभ. माझी ना कोणाशी इर्षा आहे ना कोणाशी वैर. माझी जीवन जगण्याची पद्धत फक्त थोडी वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर, लो. टिळक, ने. सुभाषचंद्र बोस हे माझे आदर्श आहेत. समाजसेवा हाच माझा धर्म आणि संघर्ष हेच माझे कर्म आहे. जिथे अन्याय,अत्याचार दिसतो तिथे मी न्यायासाठी संघर्ष करतो. मला जे चांगले वाटते, ते मी करतो. काही लोक मला चांगले समजतात काही वाईट. मला तशी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. देवाला माहिती आहे माझा धर्माचा-सत्याचा मार्ग आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयात मी कायम चकरा मारतो. कारण सरकारी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ सर्वसामान्य गरीब लोकांना मिळवून देऊ शकेन. माझ्या लोकांचे भले करू शकेन.
       माझ्याजवळ जात-धर्म, वंश, रंग, कुळ याला थारा नाही. ' ज्याचे कर्म स्वच्छ तोच उच्च ' असा माझा विचार आहे. लोक मला चुकीचे ठरवण्यात व्यस्त असतात. माझ्यावर याचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही मला एकदा भेटा तेंव्हा समजेल मी कसा आहे. लोक काहीही म्हणोत माझे मन साफ आहे. मी माझ्यासाठी नाही जगत. मी जगतोय माझ्या लोकांसाठी, समाजासाठी, देशासाठी, गोर- गरिबांसाठी, जनसामान्यांच्या हक्कासाठी.
      " माझा निसर्गाने बनविलेल्या नियमांवर पूर्ण विश्वास आहे. निसर्गाचा सर्वात सुंदर, सोनेरी नियम सदासर्वदा देने हाच आहे. जो समजाला काही देऊ शकत नाही तो कधीच आनंदी राहू शकत नाही. " अशी माझी विचारधारा आहे. मी एक क्षत्रिय आहे, जो न्यायासाठी संघर्ष करतो. मी एक ब्राह्मण आहे, जो समाजाला शिक्षित करतो. मी एक वैश्य आहे, जो समाज संचलन करतो. मी एक क्षुद्र आहे, जो समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करतो. मी जन्माने क्षत्रिय आणि कर्माने क्षुद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण आहे. मी महादेवाचा- परमात्म्याचा एक अंश, एक आत्मा, एक मनुष्य आहे. मी प्रमोद मांडवे आहे.
                                                                       आपलाच,
                                                            प्रमोद महादेव मांडवे
                                                संस्थापक/ अध्यक्ष शिवशक्ती सोशल फौंडेशन

बदनामीचे षडयंत्र : जेंव्हा सर्व लोक तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यावेळी...

        प्रमोद मांडवे वर खोटी विनायभंगाची केस केली आता तो आपल्या शरण येईल आणि मग पहिली केस माघारी घ्यायला लावायची आणि मगच विनायभंगाची केस मागे घेऊ. आता तू अडकलास तुला कमीतकमी 10 वर्षाची शिक्षा होईल. आता प्रमोद मांडवेचा माज जीरला. अश्या काल्पनिक सुखाने काहीजण विकृत मानसिक आनंद घेत आहेत. त्यांना मला सांगावयाचे आहे तुमची सगळी राजकीय ताकद मला अडकविण्यासाठी वापरली. खोटे नाटे करून माझ्यावर निर्लजपणाच्यापुढे जाऊन आरोप लावले. मला अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून आणि खोटी केस दाखल करावी यासाठी पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांना राजकीय दृष्ट्या वेठीस धरले. तरीसुद्धा सत्य लपले नाही. तुम्ही तुमच्या नेतमंडळींना मला हरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त केले आणि त्यानिपन पुरेपूर प्रयत्न केले. पण तरीसुद्धा मी तुम्हाला घाबरत नाही. यावरून मी तुमच्या आणि तुमच्या नेत्यांच्या तोडीचा आहे. असे मी किंवा इतर कोणीही म्हणत नाही तर ते तुम्हीच सिद्ध केले आहे.
        आणि तुमचा असा गैरसमज असेल की मी विनयभंगाच्या खोट्या केसमधून सुटण्यासाठी माघार घेईन. हे तुमचे दिवास्वप्न आहे कारण सत्य परेशान हो सकता है, पराजित नही। सत्य बाहेर येईलच आणि तरीसुद्धा तुमच्या कपटी बुद्धीने आणि सत्तेच्या मस्तीने माझ्यावर कटकारस्थान केलेच तर मी माझ्या मनाची अशी तयारी केली आहे की, सत्य रक्षणासाठी माझा बळी गेला तरी चालेल. मला खोट्या आरोपात संघर्ष करावा लागला तरी चालेल. मला बदनामी आणि त्रास, त्याग सहन करावा लागला तरी चालेल. मला स्वतः ला मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली तरी चालेल. पण मी सत्यासाठी काहीही तडजोड करणार नाही. आणि हो ज्यांच्या प्रेरणेने मी जीवन जगतो आहे. असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, नेल्सन मंडेला, लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद,नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही खोट्या आरोपात षडयंत्र आणि कटकारस्थानात बदनामी आणि शिक्षा सहन करावी लागली आहे. त्यांच्यापुढे मी काय गौण आहे. त्यांच्या एक टक्के फक्त मला सहन करावयाचे आहे. यासाठी या सर्व महापुरुषांनी मला आशीर्वाद दिला आहे.
      काही राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली हे सर्व घडत आहे याची माहिती सर्वांना आहेच. त्यामुळे त्यांची सर्व पिलावळ मी पराजित होण्याची वाट पाहत आहेत. काही तत्त्ववेत्ते म्हणतात, जेंव्हा सर्व लोक तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यावेळी तुमचा व सत्याचा विजय सर्वात आनंद देणारा असतो. अश्या राजकीय नेत्यांना मला सांगावयाचे आहे. मी तुमच्यापेक्षा सर्वसामान्य व्यक्ती आहे. मी कधीही तुमच्या वाटेला आलो नाही. पण तुम्हाला मी करत असलेले समाजकार्य आवडत नसेल तर तुम्हीपण फक्त राजकारण न करता, स्वार्थ न ठेवता माझ्यापेक्षा जास्त समाजकार्य करू शकता. यासाठी कोणीही तुम्हाला अडवणार नाही. पण तुमच्या गावगुंडांना पाठीशी घालणासाठी स्त्रीच्या अब्रूची काळजी न करता अशी खोटी केस करण्याच्या संकल्पनेला ' बुळगापणा ' असेच म्हणावे लागेल. असले कुटील उद्योग करण्यापेक्षा हिम्मत असेल तर समाजकार्य करा आणि गोरगरीब जनतेला न्याय द्या. तुम्ही लवकर सुधारा, स्वतःत बदल घडवा नाहीतर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेलच.
                                                                             आपलाच,
                                                                   प्रमोद महादेव मांडवे
                                                           संस्थापक/अध्यक्ष शिवशक्ती समूह

#IsupportGm



    बदनामीचे षडयंत्र : सत्यमेव जयते 

      नमस्कार मी प्रमोद महादेव मांडवे. माझी आणि तुमची प्रत्यक्ष ओळख नसली तरी शिवशक्ती सोशल फाउंडेशन व शिवशक्तीच्या इतर संस्थांच्या व सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुम्ही मला ओळखत असाल अशी आशा करतो. गेले काही दिवस हे माझ्या आयुष्यातील वाईट नाही तर संघर्षमय व अधिक ऊर्जा निर्माण करणारे दिवस आहेत. आणि संघर्ष करायला मला खूप आवडत. तसेच संघर्ष हा माझ्या पाचवीलाच पूजलाय. असो, हा लेख बनविण्याचा उद्देश एवढाच की काही लोक माझा भाऊ गणेश मांडवे याला दि. ६ रोजी काही गावगुंडांनी केलेल्या मारहाणीतून लक्ष विचलित व्हावे या उद्देशाने फेसबुक, व्हॉट्स अप व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या तथाकथित आई-बहिणींची इज्जत लुटली असा खोटा कंगवा करून आम्हाला बदनाम करण्यासाठी झटत आहेत. त्यांची लायकी, कार्य आणि चरित्र संपूर्ण तालुक्याला माहिती आहेच. पण वास्तविक तेच द्विधा मनस्थिती आहेत. कारण आधी ते माझा भाऊ गणेश मांडवे याने त्यांच्या काल्पनिक आई- बहिणींची इज्जत लुटली असे सांगत होते. आता मी प्रमोद मांडवे यांनी त्यांच्या काल्पनिक आई-बहिणीचा विनयभंग केला अशी तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केली आहे. यामागचा त्यांचा हेतू एव्हढाच आहे की, गणेश मांडवे याला झालेल्या मारहाणीची तक्रार मागे घ्यावी. आणि आमची बदनामी करावी. हे बदनामीचे षडयंत्र काही राजकीय मंडळी आणि गुंडांच्या सहकार्याने केले जात आहे.         
          पण महान तत्त्ववेत्ते म्हणतात, एखाद्या अस्सल बेवड्याने अथवा वेड्याने चांगल्या माणसाला शिव्या दिल्या अथवा खोटे आरोप केले तर त्याची बदनामी होत नाही. असो मी याविषयी कायदेशीर लढाई लढतच आहे. असे कटकारस्थान मीही करू शकतो पण मी सत्यवादी मनुष्य असून माझे कुटुंब खानदानी आणि सुसंस्कृत आहे.असा घाणेरडा आरोप करणाऱ्यांना माझे आवाहन आहे की, तुम्ही एकतरी पुरावा तुमच्या आई-बहीनीची इज्जत लुटल्याच्या अथवा विनयभंग केल्याचा द्यावा. आम्ही स्वतः अग्निकुंडात उडी मारून आमची पवित्रता सिद्ध करू. अश्या खोटे आरोप करणाऱ्यांनी आपल्याच घरातील आई-बहनिची इज्जत अशी चव्हाट्यावर मांडून दुसऱ्यावर निराधार आरोप करण्यापेक्षा आपल्या चुकांचे प्रायश्चित्त कसे करावे याचा विचार करावा. परंतु यामध्ये विशेष वाटते ते राजकीय व्यक्तींचे आणि मान्यवरांचे. काही राजकीय व्यक्ती गणेश मांडवे यांना मारहाण करणाऱ्या गावगुंडांना आणि माझ्यावर खोटे विनायभंगाचे आरोप लावणाऱ्या महिलेला सहकार्य करीत आहेत. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, ज्या सापांना तुम्ही आज दूध पाजताय आणि ज्यांची तुम्हि पाठराखण करीत आहात तेच साप उद्या तुमच्यावर विष ओकणार आहेत आणि तुमच्या पाठीवर लाथा घालणार आहेत. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होऊन सत्याची बाजू घ्यावी.
      त्याचबरोबर काही लोक असे आहेत की, जे मला आणि माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या सामाजिक कार्याशी संपूर्ण परिचित आहेत परंतु त्यांची काय अडचण आहे मला माहिती नाही. पण सत्य माहिती असून सुद्धा सत्याची पाठराखण करण्यास पुढे येत नाहीत. कदाचित त्यांच्यावर धर्मसंकट आले असेल. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती असेल. पण त्यांनी लक्षात ठेवावे की अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा आणि त्या अन्यायाला प्रोत्साहन देणारा व अन्याय दिसत असताना सुधा गप्प बसणार सर्वात जास्त दोषी असतो. आता तुम्हीच ठरवा की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात का असत्याच्या.
      शेवटी मला सर्व परिचिताना आणि दक्ष सत्यरक्षकांना एवढेच सांगायचे आहे की, हीच वेळ आहे सत्याचा विजय करण्याची. आज या सत्याला सर्वांची गरज आहे. आम्ही कोणत्याही परिस्थिती कायदेशीर आणि सामाजिक लढाई लढणार असून सर्व सत्यरक्षकांनी या लढाईत सामील व्हावे. त्याचबरोबर जे गोर गरीब लोक अश्या गावगुंडांच्या धमक्या व राजकीय दबावाखाली वावरत आहेत त्यांनी पुढे यावे आम्ही तुम्हाला मदत करू. अन्याय तिथे संघर्ष हेच ब्रीद समाजसेवा हाच धर्म याबरोबर यापुढे शिवशक्तीचे असेल.
                                                                             
                                                                                                    आपलाच,
                                                                                       प्रमोद महादेव मांडवे
                                                                                   अध्यक्ष, शिवशक्ती समूह 

#IsupportGm

 

बदनामीचे षडयंत्र : सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं ।

       काल, परवा आणि रोज मला खूप लोक भेटत आहेत आणि रोज सहानुभूती आणि झालेल्या प्रकाराबद्दल राग व्यक्त करीत आहेत. हे सर्व स्वाभाविक आहे. काहीजण मी अडकलो हे ऐकून क्षणिक आनंद घेत आहेत. मला त्यांना आनंदी बघून खूप आनंद होत आहे. त्यांना आनंदी केल्याने माझ्या पुण्यात आणखी भर पडणार आहे हे निश्चित. आणि काहीजण सगळे काही माहिती असून गप्प आहेत, षंढ झाले आहेत. का माहिती नाही? असो ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग आहे. मग काहीजण कायदेशीर प्रक्रियेवर नाराज होऊन सत्य कधी बाहेर येणार याची चौकशी करीत आहेत. कलियुग आहे, सत्याची उपेक्षा होत राहणार असे कायर विवेचन करीत आहेत.
      सत्य हे सोन्यासारखे पवित्र आणि सुंदर असते. गटारीतील घाण निघायला वेळ जाणारच पण सोन-सत्य हे बाहेर निघणार हे त्रिकालबाधित सत्य आहे. काहीजण झालेल्या बदनामीची काय असे विचारतायत. बदनाम वही होता है, जिनका बडा नाम होता है। त्यामूळे माझे नाव आणि कार्य आहे हे तरी सिद्ध होतंय. आणि एखाद्या अस्सल बेवड्याने चांगल्या व्यक्तीला शिव्या दिल्या तर त्याची बदनामी होत नसते असे काही बुजुर्ग व्यक्तींनी सांगितले आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, लोक काहीही म्हणोत, आपली जी निश्चित मते आहेत. त्यांना चिटकून राहा. विजय तुमचाच होईल. मला स्वतःला विजयी व्हायचे नाही अथवा कुणाला हरवायचे देखील नाही. फक्त सत्य जगासमोर यावे आणि सत्याचा विजय व्हावा यासाठी मी लढा देत आहे. ज्यांचा सत्यावर विश्वास नाही. ज्यांनी सत्याचा विजय कधी पहिला नाही. ज्यांचे दौर्बल्य ज्यांना खत आहे. अश्याना माझे एकच सांगणे आहे जरा धीर धरा सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं ।
                                   
                                                                               आपलाच,
                                                                            प्रमोद मांडवे
                                                   संस्थापक/अध्यक्ष । शिवशक्ती सोशल फाउंडेशन

#IsupportGm